गावागावात ग्रामदैवतांच्या अभिषेक, महाआरतीसह विधायक उपक्रमांचे होणार आयोजन*
कोल्हापूर, दि. २०: आमदार हसनसाहेब मुश्रीफ हे गोरगरिबांचे नेते आहेत. त्यांचा वाढदिवस तिथीनुसार गुरुवारी दि. ३० म्हणजेच श्री. रामनवमीदिवशी होत आहे. सबंध जिल्हाभर हा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. श्री. रामनवमीदिवशी सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील सर्वच गावांमधील ग्रामदैवतांना अभिषेक, महाआरतीसह विविध विधायक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात जिल्ह्यातील विविध प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. पाटील बोलत होते.श्री. पाटील पुढे म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यानी गेल्या ३५-४० वर्षांचे सामाजिक आणि राजकीय आयुष्य गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्ची घातले. या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार हसनसाहेब मुश्रीफ आणि गोरगरिबांचे ऋणानुबंध किती घट्ट आहेत, हे महाराष्ट्रासह देशाला दाखवून देऊया.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, गुरुवारी दि. ३० आमदार श्री. मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री. रामनवमी दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी ग्रामदैवताच्या मंदिरात जमून अभिषेक व महाआरती करावी. परमेश्वराने त्यांच्यावरील संकट दूर करून त्यांना सुरक्षित ठेवावे, असे आशीर्वाद मागूया.
आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांचा लौकिक गोरगरिबांचे नेते म्हणून राज्यभर आहे. विविध विधायक सामाजिक उपक्रमाच्या आयोजनातून त्यांना शुभेच्छा देऊया.
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे म्हणाले,आजघडीला राज्याच्या प्रमुख नेतेमंडळींपैकी आमदार हसनसाहेब मुश्रीफ हे एक आहेत. गोरगरिबांचे नेतृत्व म्हणून सर्वजण एकदिलाने त्यांच्या पाठीशी राहूया.
शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील म्हणाले, आमदार हसनसाहेब यांनी नेहमीच विधायकतेला प्राधान्य दिले आहे.
यावेळी रामाप्पा करीगार- गडहिंग्लज, भिकू गावडे -चंदगड, संभाजीराव पोवार- हातकणंगले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, माजी महापौर आर. के. पोवार, उदयराव जोशी, सुधीर देसाई, संतोष धुमाळ, मधुकर जांभळे, पंडितराव केणे, प्रा. किसनराव चौगुले, अनिलराव साळुंखे, आदिल फरास, नितीन जांभळे, शशिकांत खोत, बाबासाहेब पाटील, धनराज घाटगे, महेंद्र चव्हाण आदींची मनोगते झाली.
या बैठकीला गोकुळचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक संतोष पाटील, माजी संचालक आसिफ फरास, बी. के. चव्हाण, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, मनोज फराकटे, दत्ता पाटील, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील, युवराज वारके, धनराज घाटगे, धैर्यशील पाटील -कौलवकर, प्रकाश गवंडी, संतोष मेंगाणे, राजेंद्र पाटील, शशिकांत खोत, एकनाथ पाटील, सुनील पाटील, नितीन दिंडे, उत्तम कोराने, रमेश पाटील, विलासराव गाताडे, मधुकर जांभळे, संभाजीराव पवार, युवराज गवळी, शाहू काटकर, संजय चितारी, संतोष धुमाळ आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. अनिलराव साळोखे यांनी आभार मानले.