add_action('wp_head', function(){echo '';}, 1); Mirror Kolharpur – Mirror Kolhapur https://mirrorkolhapur.in Nation's #1 News Portal Fri, 21 Mar 2025 14:25:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.3.5 किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार https://mirrorkolhapur.in/?p=17700 https://mirrorkolhapur.in/?p=17700#respond Fri, 21 Mar 2025 14:24:50 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17700 २० मार्च-किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न झाला आहे. हि महत्वाची घटना किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या कामगार कल्याण, औद्योगिक सौहार्द आणि शाश्वत विकासाच्या प्रति बांधील असण्याचे प्रतीक आहे. हा करार उत्पादकता वाढ, कर्मचाऱ्यांचे हित आणि कंपनीचे दीर्घकालीन यश यांना चालना देणाऱ्या कार्यसंस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
वेतन करार वेळे अगोदर आणि प्रगतिशील पणे पूर्ण करण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण इतिहासाचे द्योतक म्हणून २०११ मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे झालेले वेतन करार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले आहेत. या यशामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावते.
वेतन करार सोहळ्यास कंपनीचे अध्यक्ष श्री. अतुल किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक सौ. गौरी किर्लोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल सहाय, मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. जॉर्ज वर्गिस, मुख्य वित्तीय अधिकारी श्री. सचिन केजरीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालन) श्री. मकरंद जोशी, बी टू बी विभागाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. अमरजीत सिंग, उत्पादन विभागातील मानव संसाधन विभाग प्रमुख श्री. वीरेंद्र गायकवाड आणि फॅक्टरी मॅनेजर श्री. मिलिंद बोटे यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.
कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री. संजीव गायकवाड, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र येडे, सचिव श्री. उल्हास खुटवड आणि कोषाध्यक्ष श्री. विकास कोरे यांनी प्रतिनिधित्व केले. हा करार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील परस्पर विश्वास, सहकार्य आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे.
या यशस्वी वेतन करारामुळे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या प्रगत आणि कर्मचारी-केंद्रित कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळाली आहे. कंपनीचा विकास, नवकल्पना आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत औद्योगिक सौहार्द टिकवून ठेवण्याच्या दिशेने कंपनी सातत्याने पुढे जात आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही केवळ औद्योगिक क्षेत्रातील सौदार्ह्यास चालना देणारी कंपनी नसून विविध उद्योगांमध्ये शाश्वत, कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदान करणे हेच कंपनीचे व्यापक ध्येय आहे.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड:
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड ही इंजिन, जनसेट्स आणि कृषी उपकरणे तयार करणारी आघाडीची उत्पादक कंपनी आहे. कंपनी वीज निर्मिती, उद्योग, शेती आणि सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. किर्लोस्कर ग्रुपच्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सची ओळख नाविन्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी आहे. जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत कंपनी ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्य घडवण्यासाठी शाश्वत आणि कार्यक्षम उपाय प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17700 0
मोटोहाउस आता सांगलीमध्ये! ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार https://mirrorkolhapur.in/?p=17697 https://mirrorkolhapur.in/?p=17697#respond Sun, 16 Mar 2025 14:30:58 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17697 मोटोहाउस आणि एआर मोटर्स सांगली यांच्या भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध.
बुकिंग आणि डिलिव्हरी देखील सुरू !
सांगली, 15 मार्च 2025: केएडब्ल्यू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात केव्हीएमपीएलचा व्यवसायिक उपक्रम असलेला मोटोहाउस आता भारतात आपल्या उपस्थितीला अधिक बळकट करत आहे. एआर मोटर्स सांगली यांच्या सहकार्याने सांगलीमध्ये पाचव्या डीलरशिपचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यामुळे ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रॉनिक वाहने आता सांगलीकरांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर – परिपूर्ण परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञान ब्रिक्स्टन मोटरसायकल्सच्या उच्च-प्रदर्शन बाइक्समध्ये क्रॉसफायर 500एक्स, क्रॉसफायर 500एक्ससी, क्रॉमवेल 1200 आणि क्रॉमवेल 1200एक्स यांचा समावेश आहे. उत्कृष्ट डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या या बाइक्स जागतिक बाजारात लोकप्रिय आहेत.
व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर ही शहरी वाहनांची उत्कृष्ट निवड आहे. हलके डिझाइन, मोठे टायर्स, काढता येणारी बॅटरी, कॅन्टीलिव्हर सस्पेन्शन आणि 3 रायडिंग मोडसह 130 किमी पर्यंतची रेंज या स्कूटरला अधिक खास बनवते.
ब्रिक्स्टन मोटरसायकल्सच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे:
✔ एबीएस सुरक्षा प्रणाली
✔ एलईडी लाइटिंग
✔ ब्रेम्बो-सह जे जुआन ब्रेक सिस्टम
✔ पूर्णपणे ऍडजस्टेबल केवायबी सस्पेन्शन
✔ शहरातील प्रवास, टूरिंग आणि अॅडव्हेंचर रायडिंगसाठी परिपूर्ण परफॉर्मन्स

व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर:
✔ हलके आणि मजबूत फ्रेम
✔ मोठे टायर्स आणि काढता येणारी बॅटरी
✔ कॅन्टीलिव्हर सस्पेन्शन
✔ 3 रायडिंग मोड्स आणि 130 किमी पर्यंत रेंज
मोटोहाउसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. तुषार शेळके यांचा संदेश – “मोटोहाउस केवळ व्यवसायाचा विस्तार करत नसून, भारतीयांचा राइडिंग अनुभव नव्याने परिभाषित करत आहे. जागतिक दर्जाच्या दुचाकी भारतीय बाजारपेठेत आणण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक नवीन डीलरशिपसह आम्ही परफॉर्मन्स, टिकाव आणि ग्राहक समाधानीतेला प्राधान्य देत आहोत. सांगली आणि परिसर आमच्यासाठी महत्त्वाचा बाजार आहे आणि येथील बाईक कल्चरमध्ये आम्ही महत्त्वाची भूमिका निभावू इच्छितो.”
प्रिमियम डीलरशिप आणि उत्कृष्ट सेवा
• 1000 चौरस फूट शोरूम आणि 400 चौरस फूट वर्कशॉप
• 2 वर्षे ब्रिक्स्टन मोटरसायकल्स स्टँडर्ड वॉरंटी + 2 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी
• व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर – 2 वर्षे वाहन वॉरंटी + 3 वर्षे बॅटरी वॉरंटी
मोटोहाउस भारतभर विस्तार :
मोटोहाउस 2025 च्या मध्यापर्यंत 20 नवीन डीलरशिप उघडण्याच्या तयारीत आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, मैसूर, हैदराबाद, रायपूर, दिल्ली, जयपूर येथे लवकरच नवीन शाखा सुरू होणार आहेत.
किंमत (एक्स-शोरूम, भारत)
✔ व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर: ₹1,29,999*
✔ ब्रिक्स्टन क्रॉसफायर 500एक्स आणि क्रॉसफायर 500 एक्ससी:₹4,74,100* पासून
✔ ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200: ₹7,83,999*
✔ ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200एक्स (मर्यादित 100 युनिट्स): ₹9,10,600*
मोटोहाउस बद्दल:
मोटोहाउस ही केएडब्ल्यू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात केव्हीएमपीएल ची संकल्पना असून, प्रीमियम मोटरसायकल्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. 1962 मध्ये स्थापन झालेल्या केएडब्ल्यू ग्रुपच्या वारशातून, मोटोहाउस भारतीय दुचाकी बाजारपेठेत नाविन्य आणि दर्जाच्या उच्चतम स्तरावर कार्यरत आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने आणि आयसीई (इंटर्नल कम्बस्टन इंजिन) मॉडेल्स एकत्र आणत, मोटोहाउस ग्राहकांच्या प्राधान्यांना लक्षात घेऊन उत्पादने सादर करत आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या:
🔗 मोटोहाउस अधिकृत वेबसाईट
📱 Facebook | LinkedIn | Instagram

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17697 0
टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केली हिलक्स ब्लॅक एडिशन – धाडस, ताकद आणि प्रगल्भतेचे परिपूर्ण संयोजन https://mirrorkolhapur.in/?p=17693 https://mirrorkolhapur.in/?p=17693#respond Sat, 08 Mar 2025 17:57:40 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17693 बंगळुरू, 8 मार्च -टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन सादर केली आहे. हे वाहन अशा ग्राहकांसाठी खास बनवले गेले आहे, जे शहरातील दैनंदिन प्रवास आणि कठीण रस्त्यांवर ऑफ-रोडिंग साहसासाठी एक विश्वासार्ह आणि दमदार वाहन शोधत आहेत. हिलक्स ब्लॅक एडिशन त्याच्या ऑल-ब्लॅक थीममुळे अधिक आक्रमक आणि स्टायलिश दिसते, पण त्याच वेळी त्याची ताकद, मजबूत बांधणी आणि उच्च कार्यक्षमताही कायम ठेवते.
हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये २,८ लिटरचे चार-सिलेंडर टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह येते आणि ५०० एनएम टॉर्क निर्माण करते. त्याच्या ४X४ बैठक व्यवस्थेमुळे कठीण रस्त्यांवरही सहज प्रवास करता येतो. या वाहनात टोयोटाच्या प्रगत अभियांत्रिकी आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. याची ७०० एमएम पाण्यातून सहज वाटचाल करण्याची क्षमता, मजबूत चेसिस आणि आयएमव्ही प्लॅटफॉर्ममुळे हे वाहन कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करू शकते.
हिलक्स ब्लॅक एडिशनचे बाह्य स्वरूप पूर्णपणे ब्लॅक थीममध्ये डिझाइन करण्यात आले आहे, जे त्याला अधिक दमदार आणि आकर्षक लुक देते. ब्लॅक फ्रंट रेडिएटर ग्रिल, मजबूत बोनट लाइन आणि १८-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स या डिझाइनला अधिक स्टायलिश बनवतात. तसेच ब्लॅक आऊटसाईड रिअर व्यू मिरर कव्हर्स, डोअर हँडल्स, फेंडर गार्निश आणि फ्युएल लिड गार्निश यामुळे वाहनाला एकसंध आणि आक्रमक लुक मिळतो. फ्रंट अंडर रन मुळे याला अधिक स्पोर्टी लुक मिळतो. तसेच, शार्प स्वीप्ट-बॅक एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्प्स यामुळे हे वाहन रात्री अधिक आकर्षक दिसते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने, हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये ७ एसआरएस एअरबॅग्स, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक यासारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय, हिल असिस्ट कंट्रोल आणि डाऊनहिल असिस्ट कंट्रोल यामुळे चढ-उतार असलेल्या रस्त्यांवरही हे वाहन अधिक सुरक्षित राहते. फ्रंट पार्किंग सेन्सर्स अरुंद जागांमध्ये गाडी पार्क करताना अधिक सोयीस्कर ठरतात.
या वाहनाचे इंटिरियर आधुनिक, आलिशान आणि ड्रायव्हर-केंद्रित आहे. हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री आहे, जी प्रवास अधिक आरामदायी बनवते. तसेच, ड्युअल-झोन फुली ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल प्रवाशांना हवामान आपल्या सोयीनुसार सेट करण्याची सुविधा देते. या वाहनात ८-इंच इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन देण्यात आली आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेला सपोर्ट करते. अधिक आरामदायी अनुभवासाठी ८-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, स्वयंचलित डिमिंग फंक्शनसह इलेक्ट्रोक्रोमिक इनसाईड रिअर व्यू मिरर आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश करण्यात आला आहे.
हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये स्मार्ट एंट्री आणि इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटण, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, आणि इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्ट व रिट्रॅक्ट आऊटसाईड रिअर व्यू मिरर (ब्लॅक कलरमध्ये) देखील आहेत. क्रूझ कंट्रोल मुळे महामार्गावर गाडी चालवणे अधिक सोपे होते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे, हिलक्स ब्लॅक एडिशन शहरी आणि ऑफ-रोड प्रवासासाठी एक परिपूर्ण पर्याय ठरते.
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे विक्री, सेवा आणि यूज्ड कार व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा यांनी हिलक्स ब्लॅक एडिशनच्या लॉन्चबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “टोयोटामध्ये आम्ही नेहमीच अधिक चांगली वाहने देण्याच्या दिशेने प्रयत्नशील असतो. ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राधान्ये समजून घेऊन, आम्ही अशा वाहनांची निर्मिती करतो जी सामर्थ्य, स्टाईल आणि मजबूत क्षमता यांचे उत्तम मिश्रण असतात. हिलक्स हे बर्‍याच काळापासून टिकाऊपणा आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. आता नवीन हिलक्स ब्लॅक एडिशनच्या माध्यमातून आम्ही ही परंपरा आणखी पुढे नेत आहोत. या एडिशनचे ऑल-ब्लॅक एक्सटिरियर त्याच्या दमदार आणि प्रभावी लुकला अधोरेखित करते, जे साहस आणि लक्झरी आवडणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करेल.”
वरिंदर वाधवा पुढे म्हणाले, “ब्लॅक एडिशन केवळ डिझाइनपुरते मर्यादित नाही, तर त्यामध्ये टोयोटाच्या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी, अत्याधुनिक सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि सर्वोत्तम आरामदायी अनुभव यांचा समावेश आहे. ऑफ-रोड ट्रेल्स असोत किंवा शहरातील प्रवास, हिलक्स ब्लॅक एडिशन हे ‘कोठेही जा, काहीही करा’ अशा संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे. टोयोटाची वैशिष्ट्यपूर्ण मजबुती आणि आकर्षक स्टाईल यामुळे हे वाहन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
ग्राहकांचा प्रतिसाद दर्शवतो की हिलक्स केवळ एक वाहन नसून तो एक जीवनशैलीचा भाग आहे. हिलक्सच्या अभिमानी मालकांना त्याच्या प्रभावी रोड प्रेझेन्स आणि डिझाइनमुळे मिळणारे लक्षवेधक रूप आवडते. हे वाहन मजबूती, सोपी हाताळणी आणि उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमतांसाठी ओळखले जाते. तसेच, टोयोटाच्या टिकाऊपणा, दर्जा आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या वारशाचा अभिमान बाळगणाऱ्या ग्राहकांसाठी हिलक्स एक विश्वासार्ह सहप्रवासी ठरले आहे.
टोयोटाने हिलक्स ब्लॅक एडिशनसाठी बुकिंग सुरू केले आहे, आणि ग्राहक भारतभरातील सर्व टोयोटा डीलरशिपवर हे वाहन बुक करू शकतात. मार्च २०२५ पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
ग्राहक टोयोटाच्या व्हर्च्युअल शो रूमद्वारे या वाहनाचा ३६०-डिग्री डिजिटल अनुभव घेऊ शकतात, जिथे इंटिरियर, एक्सटिरियर आणि प्रमुख वैशिष्ट्ये पाहता येतील. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टोयोटा डीलरशिपला भेट द्या किंवा अधिकृत वेबसाइट https://www.toyotabharat.com/ वर लॉग इन करू शकता.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17693 0
‘’महिला सबलीकरणाला’’ बळकटी देत ‘’टोयोटा किर्लोस्कर मोटर’’ साजरा करणार यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन https://mirrorkolhapur.in/?p=17690 https://mirrorkolhapur.in/?p=17690#respond Fri, 07 Mar 2025 15:19:23 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17690 • लिंग आधारित समतोल आणि सर्वसमावेशनाची बांधिलकी केली अधिक दृढ
बंगळुरू, ७ मार्च-महिला सबलीकरणाला बळकटी देत टोयोटा किर्लोस्कर मोटर २०२५ चा आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. ऑटोमोटिव्ह उद्योगात महिलांचे सबलीकरण आणि पुरुषांप्रमाणेच महिला कर्मचाऱ्यांना देखील समान संधी देण्याची आपली वचनबद्धता त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. उद्योगातील लिंगआधारित कर्मचारी समतोल साधताना निर्माण होणारे अडथळे दूर करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, टोयोटा किर्लोस्कर मोटर उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रासह आघाडीच्या पदांमध्ये महिलांना प्राधान्य देणाऱ्या धोरणांना आणि सुविधांना प्राधान्य देत आहे. २०३० पर्यंत ३०% महिला प्रतिनिधित्व साध्य करण्याच्या उद्देशाने, टीकेएम संस्थेतील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवत आहे. या वर्षीचा महिला दिन ‘ऍक्सिलरेट ऍक्शन्स’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे जो टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. महिलांसाठी सर्वसमावेशक कार्यस्थळ निर्माण करणे, त्यांच्या प्रतिभेला वाव देणे आणि उत्पादन क्षेत्रात त्यांना येणारे अडथळे दूर करणे हा या मागील उद्देश आहे. महिलांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी, टीकेएम आपल्या बिदाडी प्रकल्पात एक विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहे, जिथे ५०० हून अधिक महिला कर्मचारी सहभागी होतील. या कार्यक्रमात प्रमुख अधिकाऱ्यांची चर्चासत्रे, पॅनेल सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम राहणार असून, उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव केला जाईल.
या प्रसंगी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वित्त आणि प्रशासन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष जी. शंकरा म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये आम्ही लिंगआधारित कर्मचारी विविधतेला केवळ एक आकडेवारी म्हणून पाहत नाही, तर नाविन्य आणि प्रगतीसाठी असलेला आवश्यक घटक मानतो. आमची समावेशक कार्यसंस्कृती केवळ धोरणांपुरती मर्यादित नसून, जिथे महिलांचा भरभराट होईल, त्यांना नेतृत्वाच्या संधी मिळतील आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल असे वातावरण निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या सततच्या कौशल्यवृद्धी उपक्रमांद्वारे, आम्ही अधिकाधिक महिलांना या क्षेत्रातील भविष्याचा एक मुख्य भाग बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे २०३० पर्यंत ३०% महिला प्रतिनिधित्वाचे आमचे लक्ष्य अधिक दृढ होईल. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, आम्ही आमच्या महिला कर्मचार्‍यांच्या जिद्दीचा, सामर्थ्याचा आणि योगदानाचा सन्मान करतो, ज्या केवळ टोयोटाच्या यशाला नाही तर संपूर्ण ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या भविष्यात आकार देत आहेत.”
ऑटोमोटिव्ह क्षेत्रात लिंग आधारित कर्मचारी विविधतेला चालना देण्यासाठी कौशल्यविकास महत्त्वाचा आहे आणि टीकेएम महिलांना उद्योग-केंद्रित प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेशक्षमता १२०० पर्यंत वाढविण्यात आली आहे ज्यातील ५०% जागा महिलांसाठी राखीव आहेत. याचच एक ठोस पुरावा म्हणजे टीकेएमच्या महिला मॅरेथॉन टीमने २०२४ मध्ये झालेल्या ग्लोबल टोयोटा मॅरेथॉन रिले रेसमध्ये १०वे स्थान पटकावले होते. यामुळे केवळ खेळात नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात महिलांची जिद्द आणि ताकद अधोरेखित झाली. याशिवाय, ‘’टोयोटा कौशल्य -लर्न अँड अर्न” उपक्रमाने प्रशिक्षणार्थींना जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्ये दिली आहेत, ज्यामुळे त्यांचे रोजगार आणि दीर्घकालीन रोजगार संधी वाढल्या आहेत.
टीकेएमचे समावेशक धोरण हे अनुपालन, पायाभूत सुविधा आणि परिसंस्था विकास या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. अनुपालन विभागाद्वारे टीकेएममध्ये कठोर धोरणांद्वारे कार्यस्थळी सुरक्षा आणि संरक्षित वातावरण राखले जाते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, सीसीटीव्हीद्वारे सर्वत्र निगराणी, सुरक्षित वाहतूक आणि तक्रार निवारण प्रणाली यासारखी धोरणे काटेकोरपणे लागू केली आहेत. याशिवाय, महिलांना रात्रपाळीत काम करण्यास परवानगी मिळावी यासाठी कंपनीने धोरणात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे उत्पादन क्षेत्रातील महिलांसाठी अधिक रोजगार संधी निर्माण झाल्या. पायाभूत सुविधांचा विकास हा कंपनीच्या लिंग आधारित विविधता धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे. यासाठी कंपनीने वेल्डिंग, असेंब्ली, पेंटिंगसारख्या विविध विभागांमध्ये महिला कामगारांसाठी विशेष सुविधा उभारल्या आहेत. यासोबतच, ६०० महिलांना राहता येईल अशी आधुनिक वसतीगृहे उभारण्यात आली आहेत, जेणेकरून त्या सुरक्षित आणि सक्षम वातावरणात काम करू शकतील. परिसंस्था विकासाअंतर्गत कंपनीने संस्थेतील सांस्कृतिक परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी “संवर्धन” उपक्रमांतर्गत १५०० हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम राबवले, ज्यामुळे अजाणतेपणी होणाऱ्या लैंगिक भेदभावाविषयी जाणीव निर्माण झाली.
याशिवाय, महिलांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्नियुक्ती धोरण राबवण्यात आले आहे, जे महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे घेतलेल्या करिअर ब्रेकनंतर पुन्हा कार्यक्षेत्रात परतण्यास मदत करते. तसेच, रिमोट वर्किंग आणि लवचिक कामकाजाचे पर्याय, तसेच विश्रांती (सॅब्बॅटिकल) धोरण देखील उपलब्ध आहे, जे महिलांना अधिक समतोल कार्य-जीवन अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यशस्वी महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वगुण सत्रांमधून महिलांना प्रेरणा मिळत आहे. तसेच कौशल्य स्पर्धा आणि उद्योग-विचार मंचांमुळे महिलांचा महत्त्वपूर्ण भूमिकांमधील सहभाग वाढवला आहे..
टोयोटा किर्लोस्कर मोटर “सर्वांसाठी व्यापक आनंद निर्माण करण्याच्या” आपल्या उद्दिष्टाकडे पुढे जात असताना, लिंग आधारित विविधता आणि समावेशकतेसाठी असलेली कंपनीची वचनबद्धताच अधिक उज्ज्वल आणि प्रगतिशील भविष्य घडविण्यात महत्वाची ताकद ठरत आहे.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17690 0
Revia UTTO ऑइल’च्या लॉन्चसह ब्रेक्स इंडिया’ची ट्रॅक्टर क्षेत्रातील बाजार स्थिती बळकट https://mirrorkolhapur.in/?p=17687 https://mirrorkolhapur.in/?p=17687#respond Tue, 04 Mar 2025 13:23:28 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17687 कोल्हापूर:, ट्रॅक्टर वेट ब्रेक सिस्टीम्सकरिता आघाडीचे ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम) असलेल्या ब्रेक्स इंडियाने (टीएसएफ समूहाचा भाग) Revia UTTO (युनिव्हर्सल ट्रॅक्टर ट्रान्समिशन ऑइल) च्या शुभारंभासह ट्रॅक्टर ऑइल बाजारात प्रवेश करण्याची घोषणा केली. हे धोरणात्मक पाऊल वाढत्या ट्रॅक्टर विभागात कंपनीचे स्थान आणखी मजबूत करते. तसेच Revia ब्रँड पोर्टफोलिओचा विस्तार करते.
Revia UTTO हे ट्रान्समिशन सिस्टीम्स, ऑइल ब्रेक्स, हायड्रॉलिक्स आणि आधुनिक ट्रॅक्टरच्या अंतीम ड्राइव्हमध्ये वापरण्यासाठी उच्च-कार्यक्षमतेचे यूनिव्हर्सल ल्युब्रिकंट आहे. गुळगुळीत, आवाज-मुक्त ब्रेक कामकाज वितरीत करण्यासाठी तयार केलेले, Revia UTTO API GL4 मानकांची पूर्तता करते. जे गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. याव्यतिरिक्त, हे फॉर्म्युलेशन टोकाच्या परिस्थितीमध्ये गंज संरक्षण आणि स्थिर कामगिरी बाजवते. ज्यामुळे ब्रेक आणि ट्रान्समिशन सिस्टीमच्या दीर्घायुष्यात योगदान मिळते.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17687 0
ब्लू-चिप स्टॉक्ससाठी गतीशील धोरण : सॅमको म्युच्युअल फंड सादर करणार लार्ज कॅप एनएफओ https://mirrorkolhapur.in/?p=17685 https://mirrorkolhapur.in/?p=17685#respond Tue, 04 Mar 2025 12:11:41 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17685 एनएफओ खुला होण्याचा दिनांक 5 मार्च 2025 आणि 19 मार्च 2025 रोजी बंद होणार
• सक्रियपणे व्यवस्थापित फंड सॅमकोच्या मालकीच्या C.A.R.E. मोमेंटम स्ट्रॅटेजीवर आधारित
• भारताच्या आघाडीच्या 100 लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यावर भर
मुंबई,04 मार्च 2025 –सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने सॅमको लार्ज कॅप फंडसाठी न्यू फंड ऑफर (एनएफओ) सादर केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना असून ती लार्ज-कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यावर केंद्रित असेल. हा एनएफओ 5 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 या कालावधीत सबस्क्रीब्शनसाठी उपलब्ध असेल.या फंडाचा उद्देश भारताच्या अग्रणी 100 लार्ज-कॅप कंपन्यांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ उभारून दीर्घकालीन भांडवली वृद्धी साध्य करणे हा आहे. सॅमकोची C.A.R.E. मोमेंटम स्ट्रॅटेजी वापरून उच्च-गुणवत्तेच्या आणि वाढीच्या संधी शोधल्या जातील.
बाजार वरखाली होत असतानाही स्थिरता आणि सातत्यपूर्ण परतावा देत लार्ज-कॅप क्षेत्र गुंतवणुकीसाठी पसंतीचे क्षेत्र राहिले आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना मजबूत पायासह प्रस्थापित व्यवसायांच्या आधारावर लार्ज-कॅप फंडांनी उत्तम कामगिरी दर्शवली आहे. गुंतवणूकदारांना जोखीम आणि परतावा यामधील संतुलन राखावे लागत असताना सुव्यवस्थित लार्ज-कॅप पोर्टफोलिओ दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा महत्त्वाचा घटक ठरतो.
बाजारातील कामगिरी निर्देशांकावर आधारित प्रभावीपणे स्टॉक्स निवड करणाऱ्या C.A.R.E. मोमेंटम स्ट्रॅटेजीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सॅमको लार्ज कॅप फंडची रचना करण्यात आली आहे. हा फंड जास्तीत जास्त मालमत्ता वाटप सुनिश्चित करत किमान 80% गुंतवणूक लार्ज-कॅप इक्विटीजमध्ये करतो, त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगले काम करत असलेल्या आणि मजबूत व्यवसायांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळते. बाजारातील अस्थिरतेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे संरक्षण करत हा फंड टॅक्टिकल हेजिंग आणि डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीचे एकत्रीकरण करतो.

C.A.R.E. मोमेंटम धोरण वापरून हा फंड मजबूत प्राइस अॅक्शन, महसूल वाढ आणि नफा वृद्धी दर्शवणाऱ्या स्टॉक्सची निवड करतो. बाजारातील घसरणीच्या काळात लवचिकताही टिकवून ठेवत ही बहुआयामी व्यवस्था पोर्टफोलिओ उच्च-वाढीच्या संधींशी सुसंगत राहील हे सुनिश्चित करते.

या सादरीकरणाबद्दल बोलताना सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज गांधी म्हणाले, “सध्याच्या बाजारात भारतातील लार्ज-कॅप स्टॉक्स चांगली गुंतवणूक संधी निर्माण करत मिड आणि स्मॉल-कॅपच्या तुलनेत आकर्षक झाले आहेत. काही काळासाठी मिड आणि स्मॉल-कॅप स्टॉक्सने मोठी कामगिरी केली असली, तरी त्यांची मूल्ये आता अधिक प्रमाणात वाढली आहेत. याउलट, लार्ज-कॅप कंपन्या चांगली जोखीम-समायोजित परताव्याची संधी आणि स्थिरता देतात. मजबूत पाया आणि सुधारलेल्या उत्पन्नाच्या संधी यांसह अग्रणी 100 कंपन्यांचे लार्ज-कॅप पुढील बाजारवाढीचे नेतृत्व करणार आहेत. यामुळे सॅमको लार्ज-कॅप फंड सादर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. हा फंड शिस्तबद्ध, C.A.R.E. मोमेंटम-आधारित धोरण वापरून या संधीचा लाभ घेण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा दृष्टिकोन परिपूर्ण, रिलेटिव्ह मोमेंटम आणि गतिशील जोखीम व्यवस्थापन यावर केंद्रित आहे.गुंतवणूकदारांना संभाव्य वाढीचा लाभ घेण्याची संधी मिळेल, तसेच संभाव्य जोखीम कमी करण्यावर भर देता येईल.”हा फंड श्रीमती निराली भन्साळी, श्री. उमेशकुमार मेहता आणि श्री. धवल घनश्याम धनानी यांच्याद्वारे व्यवस्थापित केला जाईल. त्यांचा मूलभूत आणि मोमेंटम-आधारित गुंतवणुकीतील गाढा अनुभव गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
सॅमको अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ श्री. उमेशकुमार मेहता म्हणाले, “लार्ज-कॅप कंपन्या स्थिरता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आदर्श पर्याय आहेत. आमच्या सक्रिय स्टॉक सिलेक्शन प्रक्रियेद्वारे मजबूत मोमेंटम निर्देशांक असलेल्या स्टॉक्सची निवड करून पारंपरिक पॅसिव्ह लार्ज-कॅप स्ट्रॅटेजीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करणे आमचे उद्दिष्ट असेल. आमच्या शिस्तबद्ध दृष्टीकोनातून जोखीम-आणि त्या अनुषंगाने परतावा यासाठी पोर्टफोलिओ बनवणे सुनिश्चित होते.”
सॅमको लार्ज कॅप फंड Nifty 100 Total Returns Index (TRI) शी संलग्न असून भारतातील आघाडीच्या 100 लार्ज-कॅप स्टॉक्स मधील गुंतवणुकीशी जुळणारा मापदंड आहे. किमान 5,000 रु. ची एकरकमी गुंतवणूक आणि किमान 12 हप्त्यांसाठी 500 रु. ची एसआयपी गुंतवणूक करून यात सहभागी होता येऊ शकते.
सॅमको लार्ज कॅप फंड आणि एनएफओ बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या https://www.samcomf.com/mutual-funds/samco-large-cap-fund-direct-growth/lcdgg या वेबसाईटला भेट द्या

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17685 0
मराठी उद्योजकांनी निर्यात क्षेत्रातील संधींचा फायदा वेळीच घ्यावा – डॉ.धनंजय दातार https://mirrorkolhapur.in/?p=17682 https://mirrorkolhapur.in/?p=17682#respond Mon, 03 Mar 2025 11:02:49 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17682 मुंबई, भारताची निर्यात गेल्या दशकभरात विक्रमी वाढून ऎतिहासिक उच्चांकी पातळीला पोचली आहे आणि पुढील दशकातही हा वेग टिकून राहण्याची चिन्हे आहेत. भारतात व विशेषतः महाराष्ट्रात निर्य़ातीस अनुकूल अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत असून त्या संधींचा फायदा मराठी व्यावसायिक व उद्योजकांनी वेळीच घ्यावा, असे आवाहन दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच येथे केले.
‘मिती ग्रुप’तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र बिझनेस एन्क्लेव्ह २०२५’ परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या यशस्वी उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. माटुंग्यातील ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील नामवंत तसेच नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन-तीन वर्षांत ५ लाख कोटी रुपये उलाढालीची करण्याचे उद्दिष्ट असून त्यात निर्यातीचा महत्त्वाचा वाटा असेल, असे सांगून डॉ. दातार म्हणाले, सरकारने निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. नवे परकी व्यापार धोरण अस्तित्वात आले आहे. उद्योग-व्यवसाय-व्यापार यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधांचा दहा वर्षांपूर्वी हाती घेतलेला विकास पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे वस्तू व सेवांची देशांतर्गत उलाढाल, तसेच परदेशांना निर्यात आगामी काळात अनेकपटींनी वाढणार आहे.
इंडिया-मिडल इस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसारखा (आयएमइइसी) प्रकल्प दशकभरात साकारला तर भारतातून युरोपला होणाऱ्या निर्यातीचा कालावधी निम्मा होईल आणि खर्चही वाचेल. देशातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे तर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग प्रकल्पही पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. नवी मुंबई येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. नुकताच जाहीर झालेला वाढवण बंदर व आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक निर्य़ातीत अग्रेसर बनवणार आहे. हा सर्व विकास येत्या पाच-दहा वर्षांत फलदायी होणार असल्याने मराठी उद्योजकांनी निर्यातीच्या संधी साधायला हव्यात.”
ते पुढे म्हणाले, दुबईतील ‘जेबेल अली’ बंदराची उभारणी, तसेच नवी मुंबईतील ‘जेएनपीटी’ बंदराची उभारणी झाल्यावर आजूबाजूच्या परिसराचा वेगवान विकास मी पाहिला आहे. आताही वाढवणसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर साकारल्यावर मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या पट्ट्यात विकासाची गंगा जोमाने वाहणार आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि निर्यातेच्छुक उत्पादक यांनी ही संधी सोडू नये, अन्यथा ‘गंगा दारातून वाहिली, पण अंघोळ करायची राहिली’ अशी हळहळ वाट्याला येईल. नवउद्यमींनी आताच निर्यातीचे प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू केल्यास दहा वर्षांत तो प्रस्थापित उद्योग बनेल आणि समृद्धीची फळे चाखता येतील. त्याखेरीज मालवाहतूक, बांधकाम, पूरक उद्योग, सामग्री पुरवठा, शीतगृहे, पर्यटन, कृषी उत्पादने प्रक्रिया अशा विविध क्षेत्रांत व्यापार व रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. डॉलरच्या तुलनेत घटलेला रुपया, उत्पादकांना मिळणारा कर परतावा, सरकारची प्रोत्साहक धोरणे या पार्श्वभूमीवर निर्यात उद्योग सुरू करायला सध्याचा काळ अनुकूल आहे. व्यवस्थापन शिक्षण संस्था तसेच व्यापारी संस्थांनी नवउद्योजकांना निर्यातवृद्धीसाठी मार्गदर्शन वाढवले पाहिजे.”
‘मिती ग्रुप’च्या उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. दातार यांनी आपला उद्योजकीय प्रवास, त्यातील अनुभव व संघर्ष, परदेशी बाजारपेठांचा अभ्यास व त्यानुसार व्यवसायात केलेले बदल विशद केले. परदेशात व्यवसाय करताना येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड द्यावे, तेथील नियम, कर, धोरणे यांची माहिती कशी करुन घ्यावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले. परिषदेत जागतिक बाजारपेठेतील संधी, नेतृत्व व संघटन कौशल्य, डिजीटल व्यवसाय व विपणन, व्यवसायातील आर्थिक व्यवस्थापन व शाश्वतता यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरही परिसंवाद झाले.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17682 0
हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक हिंदुजा यांनी हिंदुजा कॉलेजला डीम्ड युनिव्हर्सिटी बनवण्याच्या योजनेची घोषणा केली हिंदुजा फाउंडेशनचे उद्दिष्ट २०३० पर्यंत १ मिलियन विद्यार्थ्यांना सशक्त बनवायचे आहे https://mirrorkolhapur.in/?p=17678 https://mirrorkolhapur.in/?p=17678#respond Mon, 03 Mar 2025 10:07:33 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17678 भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी भारतीय कॉर्पोरेट्सना विशेष शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह केला
मुंबई, ३ मार्च २०२५: शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून हिंदुजा समूहाने आपली प्रमुख संस्था हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समार्फत भारताच्या भविष्याला आकार देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सची सुरुवात शरणार्थींच्या मुलांसाठी सुरु करण्यात आलेले एक सामान्य प्राथमिक विद्यालय म्हणून झाली होती. आज ६००० पेक्षा जास्त विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स आता एक डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

आज हा समूह हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून ‘रोड टू स्कूल’ आणि ‘रोड टू लाईवलीहूड’ या उपक्रमांमध्ये भारतभर ७,००,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करत आहे. २०३० सालापर्यंत १ मिलियन विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या योजनेसह हिंदुजा फाउंडेशन शिक्षणामध्ये परिवर्तनाचा मुख्य स्रोत बनून सातत्याने प्रोत्साहन देत आहे आणि २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या भारताच्या दृष्टिकोनामध्ये प्रमुख योगदान देत आहे.

या समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड आणि त्यांच्यासह अनेक इतर मान्यवर देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन देखील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्षणीय शैक्षणिक आणि अभ्यासक्रमबाह्य यशासाठी सन्मानित केले.

हिंदुजा कॉलेजची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभामध्ये विद्यार्थी आणि मान्यवरांना संबोधित करताना, भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड म्हणाले, “सनातन हा देशाच्या संस्कृतीचा व शिक्षणाचा भाग असला पाहिजे कारण हे समावेशकतेचे प्रतीक आहे आणि यामध्ये आपली मुळे घट्ट रुजलेली असावीत यावर भर दिला. त्यांनी कॉर्पोरेट इंडियाला आग्रह केला की त्यांनी विशेष संस्था निर्माण करण्यासाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करावी. परोपकारी प्रयत्न हे कमॉडिफिकेशन आणि व्यावसायीकरणाच्या सिद्धांतांनी प्रेरित नसावेत. आपल्या आरोग्य सेवा आणि शिक्षण प्रणाली याने ग्रस्त आहे. त्यांनी शिक्षण हे सर्वात प्रभावी परिवर्तनकारी तंत्र देखील आहे, जे समानता घडवून आणते.” त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, हिंदुजा कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यापुरते मर्यादित राहणार नाही तर जागतिक प्रतिष्ठेची संस्था बनेल.
हा टप्पा पार केल्याबद्दल हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक हिंदुजा म्हणाले, “संस्था एक कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यासाठी सज्ज आहे, जे उद्योग आणि शिक्षणादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठीची वचनबद्धता मजबूत करेल, त्यासोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता अनेक पटींनी वाढवण्याच्या दीर्घकालीन योजना देखील आहेत. हे कॉलेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये नवीन कार्यक्रम सुरु करण्याची योजना तयार करत आहे, त्यासोबतच क्लायमेट फायनान्स आणि निर्यात आयात व्यवस्थापनामध्ये विशेष अभ्यासक्रम देखील सुरु करेल.”

श्री अशोक हिंदुजा यांनी सरकारकडून शिक्षणामध्ये सनातन सिद्धांतांचा समावेश करण्यावर विचार करण्याचा देखील आग्रह केला. या सूचनेशी सहमती दर्शविताना माननीय उपराष्ट्रपती म्हणाले, “सनातन समावेशकतेला प्रोत्साहन देते.”

हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पॉल अब्राहम म्हणाले, “हिंदुजा कॉलेजमध्ये पुनर्विकास केला जात आहे, अत्याधुनिक पायाभूत संरचना आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली अत्याधुनिक, अनेक मजल्यांची सुविधा तयार केली आहे. आशा आहे की, ही महत्त्वाकांक्षी योजना २०२८ पर्यंत पूर्ण होईल. आम्हाला आशा आहे की, नवीन सुविधा कॉलेजच्या भौतिक क्षमता तीन पटींनी वाढवेल जेणेकरून संधींच्या एका स्पेक्ट्रममध्ये डिजिटल आउटरीच आणि प्रोग्रामिंगच्या क्षमता वाढवल्या जाऊ शकतील.”
हिंदुजा कॉलेजमध्ये ३० पेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रम आहेत आणि त्यांना २०२३-२४ मध्ये एनएएसी ए+ मान्यता मिळाली आहे. २०२२ मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आलेल्या या कॉलेजने विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार कौशल्यांनी सज्ज करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुरूप पावले उचलली आहेत.कॉलेजचे व्हिजन स्पष्ट आहे: “आमच्या विद्यार्थ्यांना फक्त उत्कृष्टतेसाठी नाही तर इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी सशक्त बनवणे.” विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17678 0
भीमा कृषी पशू प्रदर्शनचे आज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसनसो मुश्रीफ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन https://mirrorkolhapur.in/?p=17673 https://mirrorkolhapur.in/?p=17673#respond Mon, 24 Feb 2025 05:57:52 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17673 २१ ते २४ फेब्रुवारी मेरी वेदर मैदान येथे चार दिवस चालणार प्रदर्शन
हरियाणातील विधायक नावाचा रेडा,अन्य पशु जनावरे,शेती उपयुक्त साहित्य पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात नामांकित कंपन्यांचा सहभाग,शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
विविध जनावरांचा, पशू पक्षांचा सहभाग, तांदूळसह शेतीपूरक साहित्य खरेदी करण्याची पर्वणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १६ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन येत्या २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी यावर्षी ही हे भव्य कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.२०२५ मध्ये भरविण्यात आपल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण प्रदर्शनाचे खास आकर्षण जगातील सर्वात उंच हरियाणातील विधायक नावाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा रेडा आहे.
देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात असून विविध जातिवंत जनावरे, पशुपक्षी, तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशीही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन २१ फेब्रुवारीस दुपारी ४.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसनसो मुश्रीफ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे.याचबरोबर आमदार अमल महाडिक,खासदार धैर्यशील माने आणि सर्व आमदार मान्यवर उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.
या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.चार दिवस याठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.
तर २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभास राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील उपस्थित असणार आहेत.यावेळी सर्व आमदार उपस्थित असणार आहेत.
व्याख्यानांची माहिती- दुपारच्या सत्रात कृषी तज्ञांची व्याख्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात २२ फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रातील गळीत धान्य पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. प्रशांत बाळासाहेब पवार, प्राध्यापक, कृषीविद्या विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, कराड, जिल्हा सातारा. दुर्लक्षित फळझाडांची लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर डॉ. विष्णू कुंडलीक गरांडे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे.आणि अचूक व काटेकोर जमीन व्यवस्थापन उत्पादनवाढीसाठी गरजेचे या विषयावर डॉ. जनार्दन पांडुरंग पाटील माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर. हे वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी डॉ. संजय आसवले, माजी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर हे किफायतशीर दुग्ध व्यवसाय असा करा यावर विचार मांडणार आहेत.तर डॉ. अशोक दत्तात्रय कडलग प्रमुख शास्त्रज्ञ, कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी बुद्रुक, पुणे हे ऊस उत्पादनातील आव्हाने, जमीन व पीक व्यवस्थापन आणि ए. आय. तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी अचूक वापर.
२४ फेब्रुवारी पद्मश्री श्री. पोपटराव भागूजी पवार, माजी सरपंच, आदर्शगांव हिरवे बाजार, ता. जि. अहमदनगर हे ग्रामविकासामध्ये कृषीचे महत्व व ग्रामीण पातळीवर शेतकरी सहभाग.
आणि आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ श्री. सुरेश मगदूम, सिनीअर कृषी विध्यावेता, जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगांव.आपले विचार व्यक्त करणार आहेत.
सहभागी कंपन्या-विला पंप, पॉप्युलर एग्रीकल्चर इम्प्लिमेंट, समृद्धी ट्रॅक्टर अँड मशिनरीजे, लक्ष्मी पंप, टाटा सोलर, तालोड फूड्स,चितळे डेअरी, कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन ,गोविंद मिल्क प्रॉडक्ट, वनिता ऍग्रो केम, जैन इरिगेशन लि, विजय कृषी अवजारे, स्वाती मसाले,बाहुबली प्लास्टिक, डेक्कन फार्म इक्विपमेंट, जीएनपी ऍग्रो केअर सायन्स आदी नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.या कंपन्यांची आणि अन्य उत्पादने पाहावयास मिळणार आहेत.
दिले जाणारे पुरस्कार
या प्रदर्शनामध्ये शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धांचे,जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ असणार आहेत. तसेच बाजरी नाचणी गूळ,हळद विक्रीसाठी असणार आहेत.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान,सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत.तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली जाणार आहे.तसेच विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे उंदीर तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा विविध जनावरांच्या स्पर्धा खाद्य महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत.
प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमिस्ट्रेशन असणार आहे.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17673 0
जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांना एआयएमए मॅनेजिंग इंडिया अॅवॉर्ड्समध्ये ‘दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी’ पुरस्कार प्रदान https://mirrorkolhapur.in/?p=17670 https://mirrorkolhapur.in/?p=17670#respond Sat, 22 Feb 2025 16:02:52 +0000 https://mirrorkolhapur.in/?p=17670 नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2025 – जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांना 15 व्या एआयएमए मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठेच्या ‘दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे जेएसडब्ल्यू समूहाला जागतिक स्तरावरील मोठ्या उद्योग समूहामध्ये विस्तारण्याच्या त्यांच्या परिवर्तनात्मक नेतृत्वाला मिळालेली मान्यता आहे.
आज झालेल्या समारंभात श्री. जिंदाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान आणि सन्माननीय अतिथी म्हणून वाणिज्य आणि उद्योग; इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे राज्यमंत्री श्री. जितिन प्रसाद उपस्थित होते. पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन केपीएमजी इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यझदी नागपोरेवाला यांनी केले.
श्री. जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली जेएसडब्ल्यू समूहाने उल्लेखनीय वाढ साध्य केली असून कंपनीचे उत्पन्न दुपटीहून अधिक वाढून 24 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचले आहे. त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे जेएसडब्ल्यू ने वार्षिक स्टील उत्पादन क्षमता जवळपास तिप्पट करून 39 दशलक्ष टनांपर्यंत वाढवली आहे. तसेच, जेएसडब्ल्यू ने अक्षय ऊर्जा आणि सिमेंट उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे.
या पुरस्कारातून जेएसडब्ल्यू समूहाला भारताच्या पायाभूत सुविधा आधुनिकीकरण उपक्रमांशी जोडण्यात असलेली श्री. जिंदाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, जेएसडब्ल्यू भारतातील खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर कंपनी म्हणून उदयास आली आहे. तसेच, कंपनीने आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे इलेक्ट्रिक वाहन आणि लष्करी ड्रोन यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे.
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (एआयएमए) मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड्स भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करतात. या पुरस्कार सोहळ्याच्या 15 व्या सत्रासाठी विविध नामांकित पुरस्कार विजेते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि एआयएमए चे पदाधिकारी एकत्र आले होते.

]]>
https://mirrorkolhapur.in/?feed=rss2&p=17670 0