Monday, March 30, 2026
Home अर्थ-उद्योग  प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हे काय नवीन?’...

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हे काय नवीन?’ चे विशेष स्ट्रिमिंग मराठी झी ५ वर

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ही सिरीज आधुनिक विवाहाच्या पुढच्या अध्यायात प्रेम, महत्त्वाकांक्षा, आयुष्याच्या मध्यावरील संक्रमण आणि आत्म-शोध यांचा वेध घेते ~
कोल्हापूर: मराठी मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण असलेल्या मराठी झी ५ हृदयस्पर्शी आणि आपल्याशा वाटणाऱ्या कथाकथानाचे हक्काचे व्यासपीठ असून ‘हे काय नवीन?’ या नवीन ओरिजनल सिरीजचे आता स्ट्रिमिंग होणार असून त्यात एक आनंददायी वळणही आहे! या सिरीजमध्ये खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेल्या उमेश कामतने आदित्य तर प्रिया बापट हिने रमाची भूमिका साकारली आहे. ही मालिका आकर्षण, आराम आणि प्रामाणिकपणाचा एक अतिरिक्त पदर उलगडते जो केवळ एक वास्तविक बंध निर्माण करू शकतो. कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर -जीवनाचा शोध घेणाऱ्या विवाहित जोडप्याच्या भूमिकेत आधीपासूनच असलेल्या या जोडप्यापेक्षा इतर कुणी या व्यक्तिरेखा अधिक चांगल्या साकारल्या असत्या?
वरुण नार्वेकर दिग्दर्शित, या सिरीजमध्ये आयुष्यातील मोठे टप्पे गाठल्यानंतर काय घडते यावर एक प्रेमळ, जीवनाच्या पैलूवरील भाष्य आहे. प्रिया बापट, उमेश कामत, शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओमकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव अशा उत्कृष्ट कलाकारांच्या टीमसह, ही सिरीज रमा आणि आदित्य यांचे चित्रण करते, ज्यांचे आयुष्य सुरळीत, पुरेसे नीट जगलेले आहेत. त्यांना आता प्रश्न पडला आहे, “ठीक आहे… आता काय?”
दैनंदिन जीवनाच्या पार्श्वभूमीवर हे काय नवीन? ही सिरीज अनेकदा दुर्लक्ष करत असलेल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये, मूक विरामांमध्ये, बदलत्या स्वप्नांमध्ये आणि दीर्घकालीन नातेसंबंधांमध्ये शिरकाव करणाऱ्या न बोललेल्या प्रश्नांमध्ये बुडून जाते. आपल्या दैनंदिन जीवनचक्रातून विसावा म्हणून रमा सबॅटिकल घ्यायचे ठरवते. स्वत:ला क्रिएटिव्ह वेंचरमध्ये झोकून देते. छोटेखानी, स्वत: सुरू केलेली क्लोदिंग लाईन! अगदी वेळ घालविण्याचा छंद म्हणून सुरू केलेल्या प्रवासाला अर्थपूर्ण वळण लागते. आणि जसे जीवन नेहमीच्या आश्चर्य, अपेक्षा आणि चढ-उतारांत सुरू राहते, रमा आणि आदित्य या दोघांनीही बदल घडवून आणला पाहिजे-एकत्रितपणे, परंतु वैयक्तिक पातळीवर. सिरीजच्या प्रदर्शनापूर्वी, प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी दिग्दर्शक वरुण नार्वेकरसह प्रचारासाठी शहराला भेट दिल्याने नागपूरमधील चाहत्यांना एक मजेदार आणि अविस्मरणीय आश्चर्य वाटले. वास्तविक जीवनातील विनोद आणि रील-लाइफ केमिस्ट्रीमध्ये सहजपणे वावरणारी सुप्रसिद्ध जोडी, चाहत्यांना हसवते, आपले समीकरण स्क्रीनच्या पलिकडे खरे नवरा-बायको म्हणूनही तितकेच सुंदर आहे, हे पटवून देते.
ओरिजनल सिरीजबद्दल बोलताना, हेमा व्ही. आर., चीफ चॅनेल ऑफिसर – झी मराठी आणि बिझनेस हेड- मराठी झी ५ , म्हणाल्या, “ मराठी झी ५ मध्ये, आमच्या प्रेक्षकांचे जीवन, नातेसंबंध आणि उत्क्रांत प्रवास खरोखर प्रतिबिंबित करणाऱ्या कथा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘हे काय नवीन?’ मध्ये अनेक जोडपी या टप्प्यातून जातात, परंतु क्वचितच व्यक्त होतात. बदलत्या प्राधान्यांनी भरलेली जागा, बदलत्या भावना, ओळखी भोवतीचे मिड लाईफ क्रायसीस आणि भागीदारीचे शांत पुनर्संचयण. दैनंदिन क्षणांमध्ये आणि प्रामाणिक संभाषणात रुजलेली ही सिरीज, पिढ्यानपिढ्या आणि भौगोलिकदृष्ट्या प्रतिध्वनित होणाऱ्या अस्सल कथा सादर करण्याची आमची बांधिलकी अधिक दृढ करते. अतिशय प्रतिभावान आणि खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार, प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी जिवंत केलेल्या आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या अस्सल कौटुंबिक नाट्याचा धागा कुठूनही सिरीज पाहणाऱ्या प्रेक्षकांशी हृदयस्पर्शी बंध निर्माण करेल असा आम्हाला विश्वास आहे.”
स्व-अनुभव सांगताना प्रिया बापट पुढे म्हणाली, “रमाची व्यक्तिरेखा ही अनेक स्त्रियांना आपलीशी वाटेल. ती विलक्षण आहे म्हणून नव्हे, तर ती सच्ची आहे याकरिता! जेव्हा महत्त्वाकांक्षा, ओळख आणि जबाबदारीची टक्कर होते तेव्हा अनेक महिलांना भेडसावणाऱ्या भावनिक संधींचे ती प्रतिनिधित्व करते. रमा साकारताना दीर्घकालीन नातेसंबंधांमध्ये आपण अनेकदा सोडवत असलेल्या शांत प्रश्नांचा शोध घेण्यास मदत झालीः ‘मला पुढे काय हवे आहे?’ आणि ‘माझ्या स्वतःच्या कथेत मी कुठे आहे?’ ही सिरीज त्या असुरक्षिततेला जागा देते, जी अपराधीपणाशिवाय उद्देश शोधते. अशा कंगोरे असलेल्या कथेसाठी माझा विचार केल्याबद्दल मी झी ५ ची आभारी आहे आणि प्रेक्षकांना ही कथा प्रामाणिकपणे अनुभवता यावी यासाठी उत्सुक आहे.”
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना उमेश कामत म्हणाला, “हे काय नवीन’ने किती वास्तववादी पद्धतीने विवाहाच्या अशा टप्प्याचे चित्रण केले, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मला हा प्रयत्न आवडला आदित्यचा प्रवास सूक्ष्म, अनेक पैलू असलेला आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध आहे. मराठी झी ५ ही संबंधित पात्रे आणि अर्थपूर्ण कथा सादर करण्यासाठी ओळखली जाते आणि अशा संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे दैनंदिन नातेसंबंध प्रतिबिंबित करणाऱ्या सिरीजचा भाग असल्याचा मला आनंद आहे.”
दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले, “मराठी झी ५ ने प्रामाणिक आणि भावनिकदृष्ट्या सत्य वाटणाऱ्या कथांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. ‘हे काय नवीन?’ हा त्या सर्जनशील स्वातंत्र्याचा परिणाम आहे. आम्हाला वास्तविक जीवनाच्या जवळची, साधी, प्रामाणिक आणि सखोल मानवी वाटणारी कथा सांगायची होती. आदित्य आणि रमाचा प्रवास विवाहातील उद्देश तसेच संबंध पुन्हा शोधण्याबद्दल आहे. मला वाटते की अशा जिव्हाळ्याच्या कथाकथनासाठी मराठी झी ५ मंच योग्य आहे.”
‘हे काय नवीन?’ चे स्ट्रीम आता खास झी ५ मराठी वर

RELATED ARTICLES

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हे काय नवीन?’ चे विशेष स्ट्रिमिंग मराठी झी ५ वर

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ही सिरीज आधुनिक विवाहाच्या पुढच्या अध्यायात प्रेम, महत्त्वाकांक्षा, आयुष्याच्या मध्यावरील संक्रमण आणि आत्म-शोध यांचा वेध घेते ~ कोल्हापूर: मराठी मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण...

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

कोल्हापूर: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड यज्ञ कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीवर, म्हणजेच दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी सुरू आहे. तो यज्ञ म्हणजे 'सहजसेवा...

‘मालाबार गोल्ड अॅंड डायमंड्स’च्या २०० कोटी रुपयांच्या सीएसआर उपक्रमांचे केंद्रिय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर: मालाबार गोल्ड अॅंड डायमंड्स या जगातील पाचव्या क्रमांकाच्या मोठ्या ज्वेलरी रिटेल समूहाने आणि जबाबदार दागिन्यांच्या ब्रँडने २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी २०० कोटी रुपयांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हे काय नवीन?’ चे विशेष स्ट्रिमिंग मराठी झी ५ वर

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ही सिरीज आधुनिक विवाहाच्या पुढच्या अध्यायात प्रेम, महत्त्वाकांक्षा, आयुष्याच्या मध्यावरील संक्रमण आणि आत्म-शोध यांचा वेध घेते ~ कोल्हापूर: मराठी मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण...

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

कोल्हापूर: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड यज्ञ कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीवर, म्हणजेच दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी सुरू आहे. तो यज्ञ म्हणजे 'सहजसेवा...

‘मालाबार गोल्ड अॅंड डायमंड्स’च्या २०० कोटी रुपयांच्या सीएसआर उपक्रमांचे केंद्रिय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर: मालाबार गोल्ड अॅंड डायमंड्स या जगातील पाचव्या क्रमांकाच्या मोठ्या ज्वेलरी रिटेल समूहाने आणि जबाबदार दागिन्यांच्या ब्रँडने २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी २०० कोटी रुपयांच्या...

एअरबीएनबी ने महाराष्ट्राची भारताचे ‘इव्हेंट टुरिझम’ केंद्र म्हणून होत असलेली वाढ केली अधोरेखित

कोल्हापूर, : एअरबीएनबी च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र भारतातील ‘इव्हेंट टुरिझम’चे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. ‘अनलॉकिंग महाराष्ट्र इव्हेंट इकॉनॉमी: पॉवरिंग...

Recent Comments