पीएनजी ज्वेलर्सचा ‘स्वर्ण स्वराज’ : निष्क्रिय सोन्याला अर्थप्रवाहाशी जोडणारा राष्ट्रहिताचा उपक्रम

कोल्हापूर , १४ मे २०२६ : १८३२ साली सुरू झालेल्या पीएनजी ज्वेलर्सने ‘स्वर्ण स्वराज’ या राष्ट्रहिताच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. देशातील घराघरांत साठवून ठेवलेले निष्क्रिय सोने पुन्हा अर्थचक्रात आणणे, सोन्याच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे आणि अधिक जबाबदार पद्धतीने सोन्याचा वापर व खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा उपक्रम म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सोन्याच्या खरेदीत संयम बाळगण्याचे केलेले आवाहन स्वीकारत, राष्ट्रहिताच्या भावनेतून पीएनजी ज्वेलर्सने दिलेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद केवळ एका व्यवसायाचा नसून, तब्बल १९४ वर्षांपासून भारतीय कुटुंबांशी संस्थेने जोडलेल्या नात्याचा आहे.
या १९४ वर्षांच्या प्रवासात पीएनजी ज्वेलर्सने महामंदी, दोन महायुद्धे, स्वातंत्र्यलढा, फाळणी आणि जागतिक महामारी यांसारख्या अनेक ऐतिहासिक टप्प्यांमध्ये देशासोबत वाटचाल केली आहे. ग्राहकांशी असलेली पीएनजी ज्वेलर्सची नाळ ही केवळ व्यवहारांवर आधारित नसून अनेक पिढ्यांपासून जपलेल्या विश्वासाची आहे. ‘स्वर्ण स्वराज’ हाच त्या विश्वासाचा विस्तार आहे.
भारतीय घरांमध्ये साठवलेले अंदाजे २५,००० टनांहून अधिक सोने आजही देशाची एक मोठी संपत्ती आहे. मात्र त्यातील मोठा हिस्सा लॉकर, तिजोरी आणि वारशातील दागिन्यांमध्ये बंदिस्त राहिला आहे. सोन्याची चमक कमी झालेली नाही; पण देशाच्या अर्थव्यवस्थेकडे जाणारा त्याचा प्रवाह थांबला आहे. याच सोन्याला पुन्हा अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी ‘स्वर्ण स्वराज’ उपक्रम पीएनजी ज्वेलर्स राबवत आहे.
याबाबत बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,
“जेव्हा देशाचे पंतप्रधान देशवासियांना आवाहन करतात, तेव्हा आम्ही त्याकडे केवळ एका रिटेल ब्रँडच्या नजरेतून पाहत नाही, तर देशाप्रती असलेली आपली जबाबदारी म्हणून प्रतिसाद देतो. गेली १९४ वर्षे पीएनजी ज्वेलर्स भारतीय कुटुंबांच्या आनंद, परंपरा आणि आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचा विश्वासू भाग राहिले आहे. आज आम्ही त्या विश्वासाला एका मोठ्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी जोडत आहोत. भारतातील सोने भारतातच प्रवाही राहणे, ही केवळ आर्थिक गरज नाही तर देशासाठी आपण एकत्रितपणे उचलू शकणारे प्रभावी पाऊल आहे.”

  • Related Posts

    मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

    मजबूत आर्थिक पाया आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर गुंतवणुकीचा भर नियमाधारित निर्देशांक धोरणामुळे शिस्तबद्ध आणि पारदर्शक गुंतवणुकीची संधी लार्ज आणि मिड-कॅप कंपन्यांमध्ये विविधीकरणासह गुंतवणुकीची संधी मुंबई, ११ मे २०२६ :…

    आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा दिमाखदार शुभारंभ

    आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य शुभारंभ सोहळा संपन्न · मराठी शाळा आणि मराठी उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पीएनजी ज्वेलर्सचा ‘स्वर्ण स्वराज’ : निष्क्रिय सोन्याला अर्थप्रवाहाशी जोडणारा राष्ट्रहिताचा उपक्रम

    पीएनजी ज्वेलर्सचा ‘स्वर्ण स्वराज’ : निष्क्रिय सोन्याला अर्थप्रवाहाशी जोडणारा राष्ट्रहिताचा उपक्रम

    मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

    मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

    आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा दिमाखदार शुभारंभ

    आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा दिमाखदार शुभारंभ

    जेष्ठ कलाकारांना व सिने क्षेत्रातील कामगारांना सामाजिक जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन – रविंद्र चव्हाण

    जेष्ठ कलाकारांना व सिने क्षेत्रातील कामगारांना सामाजिक जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन – रविंद्र चव्हाण

    आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौतम अदाणी यांनी स्थानिक रोजगार, चांगले जीवनमान आणि कामगारांच्या सन्मानावर भर दिला 50,000 कामगारांसाठी वातानुकूलित निवासस्थान, रोज 1 लाख लोकांसाठी जेवणाची व्यवस्था

    आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौतम अदाणी यांनी स्थानिक रोजगार, चांगले जीवनमान आणि कामगारांच्या सन्मानावर भर दिला 50,000 कामगारांसाठी वातानुकूलित निवासस्थान, रोज 1 लाख लोकांसाठी जेवणाची व्यवस्था

    गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल) तर्फे एआय, एरोस्पेस आणि भविष्याभिमुख कौशल्यांवर केंद्रित अशा जागतिक स्तरावर संरेखित STEM आणि व्यवस्थापन विद्यापीठ RISM ची स्थापना

    गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल) तर्फे एआय, एरोस्पेस आणि भविष्याभिमुख कौशल्यांवर  केंद्रित अशा जागतिक स्तरावर संरेखित STEM आणि व्यवस्थापन विद्यापीठ RISM ची स्थापना