कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर डॉ. अभिजित घोष यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यात एच१ एन१चे १,१०९ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या २०२५ मधील संपूर्ण वर्षातील ९४२ रुग्णांपेक्षा अधिक आहे. तसेच, १ जानेवारी ते १४ ऑगस्ट २०२६ दरम्यान डेंग्यूचे ५,५५८ रुग्ण नोंदविण्यात आले असून, मागील वर्षी याच कालावधीत ४,३४४ रुग्ण आढळले होते.
सतत किंवा वाढणारा ताप, तीव्र अंगदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास किंवा डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक चाचण्या केल्यास आजाराचे वेळेवर निदान होऊन गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे डॉ. घोष यांनी सांगितले.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी, सुरक्षित पिण्याचे पाणी वापरावे आणि डासांची पैदास रोखण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवावी. डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींनी लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
आरोग्य-जागृती शिबिरे, वेबिनार, आरोग्य तपासण्या आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून स्टार हेल्थकडून नागरिकांमध्ये मोसमी आजारांबाबत जागरूकता निर्माण केली जात असल्याचे कंपनीने सांगितले.






