शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर; आय. टी. क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्रांना कोल्हापुरातच मिळणार रोजगार

मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांचे विशेष प्रयत्न
मुंबई, :शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले. दिवंगत लोकनेते कै. अजितदादा पवार यांनीही आय. टी. पार्कच्या पूर्ततेसाठी दोन बैठका घेतल्या होत्या.
याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या प्रस्तावाच्या मंत्रिमंडळ मंजुरीमुळे ही जागा आता उद्योग विभागाला दिली जाणार आहे. या विभागामार्फत मोठ- मोठे प्रकल्प आणले जातील. या आयटी पार्कमध्ये मोठ मोठ्या कंपन्या येण्यासाठी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्राताई पवार वहिनी, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील लाखो आय. टी. क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुणे बेंगलोर मुंबई हैदराबादसह अमेरिका या अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. या आयटी पार्कमुळे आय. टी. क्षेत्रातील भूमिपुत्र तरुण-तरुणींना स्थानिकला कोल्हापूरमध्येच रोजगार उपलब्ध होईल. आत्ता कोल्हापूर विमानतळ आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनही सर्व सोयी आणि सेवा-सुविधांनी युक्त आहे. आयटी पार्कसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयीसुविधा आता कोल्हापुरातच निर्माण झालेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरातील गट नंबर 583, 587 व 588 मधील एकूण 36 हेक्टर 36 गुंठे जमीन प्रथमता महसूल विभागाकडे समर्पित करण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव आहे. त्यानंतर महसूल विभागाकडे समर्पित केलेल्या 36 हेक्टर, 36 गुंठे जमिनीपैकी 34 हेक्टर 36 गुंठे जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आयटी पार्क विकसित करण्यासाठी हस्तांतरित करावी. या जमिनीची कृषिक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परीगणित केलेली संपूर्ण रक्कम वसूल करून भोगवटादार वर्ग- दोन या धारणाधिकाराने कब्जे हक्काने प्रदान करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात यावा, अशी मागणी प्रस्तावात नमूद केली आहे.
शेंडा पार्कातील ही जागा मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असून आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आणि शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत. जवळच शिवाजी विद्यापीठ आणि अन्य नामांकित संस्थाही असल्यामुळे कुशल मनुष्यबळही सहज उपलब्ध होणार आहे. या जागे लगतच २५ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि २५ एकर जागेवर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ प्रस्तावित असून नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

  • Related Posts

    मागणीत वाढ होत असतानाही आयओसीकडून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरू

    : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसी) देशातील विविध भागांमध्ये इंधनाच्या मागणीत वाढ होत असतानाही पेट्रोल (एमएस), डिझेल (एचएसडी) आणि एलपीजीची अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी देशभरात आपले संचालन आणि लॉजिस्टिक्स समन्वय…

    कोल्हापूर जिल्ह्यासाठी सरपंच सौ. कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६

    कोल्हापूर, 1जून 2026-प्रगत शेती आणि वैज्ञानिक पीक पोषण पद्धतींमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाधन अॅग्रीटेक लिमिटेड (एमएएल) तर्फे कोल्हापूर, जिल्ह्यातील पन्हाळा लुक्यातील सरपंच सौ. कविता सरदार माने…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मागणीत वाढ होत असतानाही आयओसीकडून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरू

    मागणीत वाढ होत असतानाही आयओसीकडून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरू

    कोल्हापूर जिल्ह्यासाठी सरपंच सौ. कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६

    कोल्हापूर जिल्ह्यासाठी सरपंच सौ. कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६

    ‘स्टार युनिऍडवाइस’चा उपक्रम; ‘जॉब-फर्स्ट’ मॉडेलद्वारे महाराष्ट्रातील तरुणांना हॉटेल व्यवस्थापनात करिअरची नवी संधी

    ‘स्टार युनिऍडवाइस’चा उपक्रम; ‘जॉब-फर्स्ट’ मॉडेलद्वारे महाराष्ट्रातील तरुणांना हॉटेल व्यवस्थापनात करिअरची नवी संधी
    स्पार्क्सने ‘समर स्वॅग’ कॅम्पेनअंतर्गत शू-स्टाईल सँडल्स लॉन्च केल्या

    यूडब्‍ल्‍यूए इंडियाकडून ऐतिहासिक शिष्यवृत्ती प्रोग्रामची घोषणा

    यूडब्‍ल्‍यूए इंडियाकडून ऐतिहासिक शिष्यवृत्ती प्रोग्रामची घोषणा

    पीएनजी ज्वेलर्सचा ‘स्वर्ण स्वराज’ : निष्क्रिय सोन्याला अर्थप्रवाहाशी जोडणारा राष्ट्रहिताचा उपक्रम

    पीएनजी ज्वेलर्सचा ‘स्वर्ण स्वराज’ : निष्क्रिय सोन्याला अर्थप्रवाहाशी जोडणारा राष्ट्रहिताचा उपक्रम