कागल, दि. २०:बोळावी ता. कागल येथील समरजीत घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी श्री. घाटगे यांच्या नेतृत्वाला रामराम ठोकत आमदार हसनसाहेब मुश्रीफ गटात प्रवेश केला. या प्रवेशाबद्दल आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार झाला. श्री. घाटगे यांच्या निष्क्रिय नेतृत्वाचा समाजाला काहीही उपयोग नसल्यामुळेच तो गट सोडत असल्याच्या प्रतिक्रिया, यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये नारायण हरी पाटील, पांडुरंग हरी पाटील, दत्तात्रय नारायण पाटील, उदय नारायण पाटील, शंकर आनंदा पाटील, आनंदा कृष्णा पाटील, मेघाराणी शंकर पाटील, राजाराम श्रीपती कांबळे, अमोल राजाराम कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्या शकुंतला राजाराम कांबळे, सागर राजाराम कांबळे, शोभा सागर कांबळे यांचा समावेश आहे.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही……..
यावेळी बोलताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आलेल्या या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवेन. माझ्यासह माझे कार्यकर्तेही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत. गेल्या ३० -३५ वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गट -तट, पक्ष -पार्टी असा भेदाभेद न मानता काम करीत राहिलो. त्यामुळेच जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले. जनतेच्या आशीर्वादाची ही कवचकुंडले सदैव माझ्यासोबत असतील.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराजबापू पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले या प्रमुखांसह बोळावी येथील प्रमुख कार्यकर्ते रामदास पसारे, पुंडलिक वास्कर, आनंदा पाटील, भैरवनाथ खांडेकर, विलास पाटील, दत्तात्रय पोटले, प्रल्हाद मोरे, सचिन पोवार, योगेश जगदाळे, दयानंद कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.