हुपरी नळपाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम तात्काळ सुरू करा: शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव
कोल्हापूर /प्रतिनिधी
हुपरी ता.हातकणंगले येथील रखडलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीनं ३० डिसेंबर रोजी हुपरी नगरपरिषद कार्यालयावर भव्य घागरी मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनास निवेदणाद्वारे दिलायं.
हुपरी शहरातील बिकट पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन आघाडी शासनामार्फत २०१४ साली भारत निर्माण योजनेतंर्गत ११ कोटी ४० लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात होती.तर या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ६० टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित टाक्यांच ४० टक्के काम पूर्णतः अद्याप पूर्ण झालं नाही. त्यामुळं शहरातील अनेक भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून चार ते पाच दिवसाआड पाणी मिळत आहे.तरी या रखडलेल्या कामाची चौकशी व्हावी आणी या संदर्भात मार्ग काढून तात्काळ कामास सुरुवात करण्यात यावी अशी प्रमुख मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलीयं.सदर मागणीचे निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागास देण्यात आलं.दरम्यान रखडलेल्या नळपाणी पुरवठा योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत प्रशासनास धारेवर धरण्यात आलं.तरी या रखडलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी अन्यथा दिं.३० डिसेंबर रोजी हुपरी नगरपरिषद कार्यालयावर शिवसेनेच्या वतीनं भव्य घागरी मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिलायं.
यावेळी उपजिल्हा प्रमुख सात्ताप्पा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील,तालुका महिला संघटीका सौ.उषाताई चौगुले,विभाग प्रमुख विनायक विभूते,शहर प्रमुख अमोल देशपांडे, शहर संघटीका सौ.मिना जाधव, यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.